मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात केलेल्या आरोपांना पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले की, आमचा पक्ष सुरुवातीपासूनच सांगत आहे की देशभरात मतदान चोरले जात आहे. केवळ महाराष्ट्रातील पराभवानंतरच नाही तर लोकसभा निवडणुकीपासूनच हे सुरू आहे.आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालवला जात असल्याचा भास होतो. राहुल गांधी यांनी केलेले आरोप केवळ बोलण्यापुरते नाहीत तर पुराव्यासह आहेत. एकाच नावाचा आणि एकाच फोटोचा मतदार वेगवेगळ्या मतदारसंघांत मतदान करतो, असे प्रकार घडत असल्याचा त्यांनी दावा केला.
त्यांनी निवडणूक आयोगाला फक्त खंडनपत्रक काढण्याऐवजी राहुल गांधींसमोर प्रत्यक्ष चर्चेसाठी येण्याचे आव्हान केले. तसेच, आजच्या AIच्या युगात आयोग सीसीटीव्ही फुटेज का देऊ शकत नाही, असा सवाल उपस्थित केला. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यास देशातील आणि जगातील लोकशाही तसेच संविधान धोक्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
No comments:
Post a Comment