निवडणूक आयोगाने फक्त राहुल गांधींशीच चर्चा करावी – आदित्य ठाकरे - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Sunday, 10 August 2025

निवडणूक आयोगाने फक्त राहुल गांधींशीच चर्चा करावी – आदित्य ठाकरे

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात केलेल्या आरोपांना पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले की, आमचा पक्ष सुरुवातीपासूनच सांगत आहे की देशभरात मतदान चोरले जात आहे. केवळ महाराष्ट्रातील पराभवानंतरच नाही तर लोकसभा निवडणुकीपासूनच हे सुरू आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालवला जात असल्याचा भास होतो. राहुल गांधी यांनी केलेले आरोप केवळ बोलण्यापुरते नाहीत तर पुराव्यासह आहेत. एकाच नावाचा आणि एकाच फोटोचा मतदार वेगवेगळ्या मतदारसंघांत मतदान करतो, असे प्रकार घडत असल्याचा त्यांनी दावा केला.
त्यांनी निवडणूक आयोगाला फक्त खंडनपत्रक काढण्याऐवजी राहुल गांधींसमोर प्रत्यक्ष चर्चेसाठी येण्याचे आव्हान केले. तसेच, आजच्या AIच्या युगात आयोग सीसीटीव्ही फुटेज का देऊ शकत नाही, असा सवाल उपस्थित केला. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यास देशातील आणि जगातील लोकशाही तसेच संविधान धोक्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!