मुंबई : मुंबईतील कबुतर खान्यावरून सुरू असलेल्या वादावर उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवत कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई केली असून कबुतरखाने सुरू राहणार नाहीत, हे स्पष्ट केले आहे. मुंबई पालिकेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन कबुतरखाना बंद करून दाणापाणी देणे थांबवले होते. या निर्णयानंतर जैन समाजाने आक्रमक भूमिका घेत प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात नेले होते. अखेर न्यायालयाने कबुतरखाना बंद ठेवण्याचा आधीचा निर्णय कायम ठेवला. दादरमधील कबुतरखान्यांवरील बंदी कायम ठेवताना न्यायालयाने नागरिकांचे आरोग्य हेच प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. दिलेल्या आदेशाचा अवमान होऊ नये, असा इशाराही कोर्टाने दिला. तसेच, निकालावर हरकत असल्यास कायदेशीर दाद मागण्याचे पर्याय
उपलब्ध असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. पालिका कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक होत ४ ऑगस्ट रोजी मोर्चा काढला होता. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात, हे वरवरचे कारण असून मुंबईतील जागा व चौकांवर कब्जा करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मोर्चादरम्यान करण्यात आला.
No comments:
Post a Comment